मुंबईराज्य

बळीराजासाठी मोठी गुड न्यूज! – आता टपालाने माती परिक्षणासाठी पाठवता येणार

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी निर्णय

टीम आवाज मराठी मुंबई प्रतिनिधि | ३ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून मंत्रालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाविषयी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.

या सभेत खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा अशा विविध सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.  राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत माती परिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना पोस्ट विभागामार्फत माती परीक्षण करण्यासाठी नमुना पाठविण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी पोस्ट विभागामार्फत माती परीक्षणाला चांगला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प यशस्वी झाला तर वेळ आल्यास विद्यापीठातील माती परिक्षण केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button