धुळे

भरधाव कंटेनरचा भिषण अपघात, १० जणांचा जागीच चिरडून मृत्यू

मुंबई आग्रा रोडवर कंटेनर हॉटेल मध्ये घुसून भीषण अपघात

टीम आवाज मराठी, धुळे | ०४ जुलै २०२३ | : बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेडराजा जवळील समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात होऊन २६ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या अपघाताची अगदी ताजी घटना असतानाच लागलीच धुळे-मुंबई-आग्रा हायवेवर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. सदर अपघात  भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने ने हा अपघात झालेला आहे. या भीषण अपघातात १० जणांचा जागीच मृत्यूमुखी झाले आहे, तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात १५ ते २० जण जखमी झाले आहेत.

मुंबई-आग्रा हायवेवरील पळासनेर बायपासवर आज सकाळी ११ वाजेच्या आसपास हा भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे, मदतकार्य सुरू आहे. आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या १४ चाकी कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाल्याने या कंटेनरने सुरवातीस समोर चालणाऱ्या दोन वाहनांना धडकले
सदर अपघात इतका भयंकर होता की, त्यानंतर रस्त्याला लागून असलेल्या हॉटेलमध्ये हा कंटेनर घुसून मागील बाजूने बाहेर पडला. अपघाताचे माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले असून तेथील स्थानिकांनी मदतकार्य मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button