जळगावराजकीयराज्य

“माझी माती, माझा देश” या अभियानाची लासूरला सांगता

चोपडा प्रतिनिधी आवाज मराठी | दि १४ ऑगस्ट २०२३ | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम साकारला जातोय. या महत्वकांशी उपक्रमाच्या मध्यमातून “माझी माती, माझा देश” ही अभिनव संकल्पना देखील साकारली जात आहे. ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमाची सांगता आज दि. १४ ऑगस्ट रोजी लासूर येथील साखर बाहूली परिसरात करण्यात आली.

दरम्यान या कार्यक्रमाचे अध्यक्ष चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर .ओ. वाघ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा सुतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ, माजी पंचायत समितीचे सदस्य अनिल पाटील, गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, माजी सरपंच जनाबाई माळी, उपसरपंच अनील वाघ, क्षत्रिय माळी समाजाचे माजी अध्यक्ष शंकर महाजन होते. या कार्यक्रमात सुरवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गावातील माजी सैनिकांच्या उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. या कार्यक्रमात माजी सैनिक बापुराव सोनवणे, डॉ. प्रकाश माळी, जयवंत वाघ, सुभाष वाघ, सुदर्शन पाटील, किशोर चौधरी, देवाजी माळी, दिपक पाटील, सागर जाधव, विर पत्नी दिपीका पाटील यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, गावातील सर्व संस्थाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. पी. पाटील यांनी, अध्यक्षीय भाषण गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ , तर सुत्रसंचालन जितेंद्र माळी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button